__________________________________

Saturday

दिवाळीचे Aftermaths - भाग २

काल Aftermaths मध्ये थोडे दुःख व्यक्त करून झाले, आज काही मजेदार आणि सुखद गोष्टी पाहू.

दिवाळी आली की आमचे डॉक्टरकाका खूष असतात. कारण उघड आहे; दिवाळीमध्ये किंवा better said दिवाळीनंतर लोकांच्या तब्येती बिघडायला सुरू होते. बदललेली हवा, थंडी या गोष्टी आहेतच, परंतु भरपूर आग्रहाला बळी पडून केलेला बेदम फराळ हे मुख्य कारण आहे. काका म्हणतात, की काही वर्षापूर्वी केवळ फराळ आणि त्यामुळे झालेले विविध परिणाम या केसेस असत. आता मात्र यात (सुध्दा) Variety आलेली आहे. म्हणजे कसे, तर सुमारे १० वर्षापूर्वी त्यांच्याकडे दिवाळीनंतर जे पेशंट येत, त्यांत मुख्यतः अपचन ही तक्रार असे, त्यानंतर घसा बसणे, सर्दी यांच क्रमांक असायचा. आज अपचन आपले स्थान टिकवून आहे, मात्र डोकेदुखी, कानदुखी आणि किरकोळ भाजणे (पुन्हा फटाके..दुसरे काय) यांनी घसा आणि नाक यांना मागे टाकले आहे, असे त्यांचे निरीक्षण आहे. त्यांची ही Comparison ऐकून मला तर फारच मौज वाटली.


दिवाळीनंतरचे काही दिवस हे दिवाळी अंकांचे असतात. सुटीच्या दिवशी दुपारी मस्त जेवण करावे आणि पलंगावर लोळत एखादा "आवाज", "जत्रा", "किस्त्रीम" किंवा "किशोर" वाचावा हे एक फार सुंदर वास्तव आहे. सोबत तोंडात टाकायला शिल्लक राहिलेला फराळ असतोच. हे अंक भरपूर मोठे असल्याने ते संपवण्यात एखाददोन महिने सहज जातात. दिवाळी अंकांचे वाचन हा आपल्या मध्यमवर्गी शहरी मराठी संस्कृतीचाच एक भाग बनलेला आहे.


असो. आता दिवाळी संपलेली आहे. उद्यापासून इतर विषयांकडे वळावे.


उद्या भेटूच परत...

No comments:

Post a Comment