__________________________________

Sunday

माझ्या आयुष्यातला जम्बो....




अनिल कुंबळेने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली... एक पर्व संपले. भारतीय क्रिकेटचा ‘जम्बो’ अध्याय संपला. 






कुंबळे हा खेळाडू पहिल्यांदा मी पाहिला तेव्हाच तो मला फार आवडला होता. त्याचे 
कारण म्हणजे, त्यावेळी तो चष्मा लावून क्रिकेट खेळत असे. मलाही त्यावेळी नुकताच चष्मा लागलेला होता. इतक्या लहानपणी घडलेली (वय वर्षे ७) ही माझ्या आयुष्यातली फार मोठी घटना होती आणि अर्थातच मला त्याचा बर्‍यापैकी धक्का बसला होता. सांगायचा मुद्दा हा, की कूंबळेला चष्मा असल्याने, तो नेहमी मला ‘माझ्या गटातला’ वाटत असे. त्याचे क्रिकेट skills हा गौण घटक होता.

नंतर १-२ वर्षांत मला थोडे क्रिकेट समजू लागले, त्यावेळी हा माणूस, इतका उंचापुरा, भक्क्म असूनदेखील, Spin Bowling का करतो? हा प्रश्न मला सतावत होता. कारण, spin bowling ही तब्येतीने किरकोळ (किंवा स्थूल) असलेल्या लोकांची मक्तेदारी आहे, अशी माझी समजूत होती (त्यांना जास्त धावायला जमत नाही, हे स्वतःच देलेले कारण). पण कुंबळेला पाहून (आणि तो माझ्या गटातला असल्याने), मी शाळेत किंवा सोसायटीत संधी मिळेल तशी spin bowling टाकायचा प्रयत्‍न करत असे.

यानंतरच्या काळात कुंबळेची action जरी spinner ची असली तरी त्याचे बॉल वळतच नाहीत, असे कु्ठूनसे कळले. शिवाय spinner च्या मानाने त्याचे चेंडू खूप वेगवान असतात, तसेच त्याच्या घरच्या संघाकडून (कर्नाटक) तो वेगवान गोलंदाजी करतो, हेही समजले. खरे सांगायचे तर त्यावेळी तो जरासा मनातून उतरला. या खप्पामर्जीचे कारण आजही मला नीटसे माहित नाही. पण तरीही त्याचा चष्मा हा माझा weak point होताच.

साधारण, मी सहावी-सातवीत असताना माझी संगणक या प्रकाराशी ओळख झाली. आणि पुढे १-२ वर्षांत असे समजले की कुंबळेचे टोपणनाव "जम्बो" असून तो Software Engineer आहे. (जवागल श्रीनाथसारखा...). हे कळताच, कुंबळेचे माझ्या मनातील स्थान खूपच उंचावले गेले. कारण...त्यावेळी मीपण असे ठरविले होते की आपण software programming मध्ये करीअर करायचे...

पुढे माझे plans बदलत गेले, तसेच माझे क्रिकेटप्रेमही कमी झाले...(फॉर्म्युला वन, WWF यांनी वेड लावले होते). पण त्याच दरम्यान त्याने लाखांत एक अशी एका डावात १० बळींची कामगिरी केली. मी परत त्याला follow करू लागलो.

नंतर जम्बोची कामगिरी म्हणजे नुसते एकावर एक विक्रम चढत गेले. २०० बळी, ३०० बळी, ४०० बळी, कपिलदेवला मागे टाकले, ५०० बळी इ. नुसत्या खचाखच बातम्या येत होत्या. एक आठवते, या काळात कुण्या एका पत्रकाराने त्याला त्याच्या ‘न वळणार्‍या’ फिरकी गोलंदाजीबद्दल छेडले होते, जम्बो शांतपणे म्हणाला, "या गोलंदाजीनेच मी आतापर्यंत ३०० हून अधिक विकेट्स काढल्या आहेत, अजूनही तितक्याच काढेन..."

Meanwhile, त्याने (आणि योगायोगाने मीही)  चष्मा सोडून कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायला सुरुवात केली होती. (नंतर मी परत चष्मा सुरू केला, हा भाग वेगळा.)

आज त्याने बरीचशी अपेक्षित पण काहीशी अकस्मात निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी त्याच्या नावावर ६१९ बळींची नोंद आहे. त्याने आपले वाक्य खरे करून दाखवले. भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज हे त्याचे स्थान लवकर धोक्यात येईल असे वाटत नाही.

जाता जाता शेवटचे. गेल्या वर्षी जम्बोने Oval वर शतक झळकावले. त्यावेळी आम्हा दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. तो तिथे मैदानावर जवळजवळ नाचला होता....आणि मी इथे भारतात ‘अरे लय भारी’ असे म्हणत त्याचा वॉलपेपर Desktop ला लावला होता...(Normally, I'm against any kind of celebrity wallpapers)

असो. एक दैदीप्यमान पर्व आज संपले. असा अंतर्बाह्य क्रिकेटर (आठवा : जबडा फ्रॅक्चर झालेला असताना त्याने केलेली गोलंदाजी...) फार दुर्मिळ असतो.

Thank you Jumbo for all the best cricket you offered us, thank you personally for being with me. Best of Luck for your future life...


No comments:

Post a Comment