__________________________________

Wednesday

कालचा विषय पुढे....





तर काल मी असे म्हणत होतो, की सा रे ग म प हा जो कार्यक्रम आहे, त्यात सध्या लहान मुलांची स्पर्धा सुरू आहे (बहुतेकांना हे माहीत आहेच...). काय मुले गातात जबरदस्त....मी तर फिदा झालो...

केवळ वय लहान म्हणून कौतुक नाही. खरंच ही मुले मस्त गातात. एवढ्याशा वयात ही गाणे म्हणायला शिकली कधी, हाच मला प्रश्न पडतो. काही असो, ऐकायला तर झकास वाटते हे खरे.

पण अधिक प्रमाणात talent असले काही चुकीची परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते हे पहा.

थोडा खोलात जाऊन विचार केला की आणि प्रश्न निर्माण होतात. म्हणजे, आता ही मुले इतकी गुणी आणि brilliant आहेत, हे शंभर टक्के खरे. परंतु, यांच्या ‌दृष्टीने ही केवळ "आणखी एक स्पर्धा" असे नसेल कशावरून? या सर्व मुलामुलींमध्ये talent ठासून भरलेले आहे हेही लगेच जाणवते. अर्थातच, ही मुले त्यांच्या शैक्षणिक बाबतींतही तितकीच हुशार असणार आहेत...आणि आपण आत्ता कितीही उदोउदो केला तरी चाकोरीबद्ध शिकून नोकरी करणे / आपल्या पायांवर उभे राहणे, यालाच आपल्याकडे यशस्वी जीवन समजले जाते. अशा परिस्थितीत जर ही मुले पुढे जाऊन गायनात करिअर करणार काय? This is the big question...करणार असतील तर त्यासारखे दुसरे काही नाही. पण ही शक्यता ५% पण नाही असे मला वाटते. त्यामुळे, फक्त "आणखी एक बक्षिस" मिळवायचे, घरी जायचे, शोकेसमध्ये लावायचे आणि "आता फार अभ्यास बुडालाय...आता सर्व बंद...गाण्याचा क्लाससुध्दा.." हेच होणार असेल..तर मग का करायचा सगळा अट्टाहास? फक्त पालकांची कॉलर ताठ करायला?

हा त्या मुलांच्या मेहनतीवर अन्याय आहेच, पण दैवदत्त देणगीवरही आहे.

या सगळ्याचा दुसरा एक पैलूपण आहे. वास्तविक, या कार्यक्रमाचा हेतू होतकरू कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे, जे लोक या कलेसाठी serious असतील, त्यांनी यात यश मिळवणे हे जास्त चांगले नाही का? only for example, ती धिटुकली मुग्धा खच्चून sms मिळवती आहे. बहुतेक ती ’जनाधारा’वर स्पर्धा जिंकेल असा माझा अंदाज आहे. उद्या ती मोठी झाल्यावर तिच्या पालकांनी तिला समजा Biotechnologist केले तर, खरा अन्याय होतो, तो जी दुसरी धिटुकली आहे, कार्तिकी, तिच्यावर. कारण तिला गाण्यात करिअर करायचे असते, पण स्पर्धा न जिंकल्यामुळे तिने नाउमेद हो‍ऊन तो नाद सोडलेला असतो.

This becomes an Anti Win-Win situation...

हे झाले केवळ उदाहरणापुरते. असेच होईल असेही नाही, पण नाहीच होणार असेही नाही. देवाकडे एवढेच मागणे (जे ज्ञानदेवांनी सांगून ठेवले आहे), "जो जे वांछील, तो ते लाहो...." आपण सध्या गाणी ऐकावीत आणि त्यांचा लुत्फ घ्यावा...जास्त विचार केला की जास्त त्रास होतो.


No comments:

Post a Comment